दि.15/04/2025
🌷छत्रपती शिवराय आणि कलिवर्ज्य 🌷
एक खोटी व निराधार कल्पना तुमच्या आमच्या सर्वांगीण विकासात कशी अडसर ठरू शकते याचे एक मोठे उदाहरण देता येईल.
पुराण कथांप्रमाणे चार युग सांगितले जातात त्रेता युग ,द्वापार युग,सतीयुग आणि सध्या चालू असलेला कलियुग.आता या कलियुगात वर्ज्य केलेल्या बाबी,त्याचे नियम म्हणजे कलिवर्ज्य होय.म्हणजे हे कलियुग लागल्यावर काय काय करू नये ते सांगितले आहे.ते ते वर्ज्य आहे.यातील एक म्हणजे समुद्र पर्यटन निषिद्ध माणले आहे.कलियुगात समुद्र पर्यटन करता येणार नाही.
याउलट मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी मोहीमा राबविल्या.सागरी व्यापार केला.सागरी मार्गाचे धोखे लक्षात घेऊन आरमाराची उभारणी केली, जलदुर्ग उभारले.म्हणजे लावून दिलेल्या थोतांड नियमांना शिवरायांनी झुगारून दिले.कलिवर्ज्य म्हणून घातलेली बंधने राजांनी माणले नाही.यामुळे त्यांचे काहीही वाकडे झाले नाही.
याचेच अनुकरण मात्र बाळ गंगाधर टिळक यांना करता आले नाही.ते परदेशात तर गेलेच.परंतू परदेशात जाण्याकरीता समुद्र पर्यटन केले,जे की निषिद्ध आहे, वर्ज्य आहे म्हणून त्यांनी प्रायश्चित्त घेतले.असा हा धर्म आंधळेपणा.
दोनशे वर्षांपूर्वी जे शिवरायांनी केले,त्या शिवरायांचा आदर्श टिळकांना घेता आला नाही.
संदर्भ -देवादिकांचे रहस्य.
संकलन व मांडणी
अशोक मांदाडे,गडचिरोली .
No comments:
Post a Comment